नेचर गार्ड ऑर्गनायझेशन (महाराष्ट्र राज्य) कडून सुचना

पावसाळा सुरू झाला आहे सावधान…

निसर्गचक्र राखण्यासाठी सापांना मारू नका, सर्पमित्रांना बोलवा.

पावसाचे पाणी बिळात गेल्याने बिळातील साप जीव वाचवण्यासाठी बाहेर येतात, पर्यायाने अनेक साप मानवी वस्तीत भक्ष व निवारा शोधण्यासाठी मानवी वस्तीत येतात. त्यातूनच सर्पदंशाच्या घटना घडतात. सर्पदंश होण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक आहे. सर्पदंश टाळण्यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे.

काय काळजी घ्याल ?

रात्री जमिनीवर न झोपता कॉट किंवा बाजेवर झोपावे.

● घराजवळ पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड विटांचे ढीग, वाळलेले सरपणचा साठा करू

नये.

घराजवळ खिडकी दरवाजाला लागून झाडाच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घेणे.

• सरपण व गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनी पासून उंचीवर ठेवा. • चालताना पायात बूट घाला, शेतात काम करताना गवतात एकदम हात घालू नका, जिथे काम करायचे तिथे आधी मातीचे लहान ढेकळे फेकून, तसेच काठी जमिनीवर आपटून काम करावे.

• अंधारात जाताना नेहमी हातात टॉर्च बाळगावी.

• घराच्या परिसरात गवत वाढून देऊ नका.

● आपल्या घराच्या परिसरात साप निघाल्यास जवळ जाऊ नका स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्रांना कळवावे.

• सर्पमित्र येईपर्यंत त्या सापावर लक्ष ठेवावे, श्यक्य असल्यास लांबून फोटो घ्यावे.

• रात्री शूज किंवा चप्पल उंच ठिकाणी ठेवावे.

● घराजवळ नेहमी स्वछता ठेवावी.

सर्पमित्र गणेश टिळे कर (अध्यक्ष, महा. राज्य) ९९६०५१६३६६, ९७६३५१६३६६

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!