श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे करोना काळानंतर प्रथमच भरलेल्या सोमवती अमावस्येला भाविकांची हजारोंची गर्दी

श्री क्षेत्र निमगाव खंडोबा हे बारा मल्हार पैकी एक असून कोरोना काळानंतर प्रथमच आलेल्या सोमवती अमावस्येला भाविकांनी हजारोंनी उपस्थिती दाखवली. सकाळी ठीक १० वाजता देवाचे पालखीतुन स्नानासाठी भीमा नदी कडे प्रस्थान झाले.

त्यानंतर पालखीची वाद्यांच्या गजरात मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी ठिकाणी देवाला पंच आरतीने ओवाळले. पालखीपुढे सदानंदाचा येळकोट म्हणत भंडारा खोबरे उधळून देवाचा जयघोष करीत होते.

यावेळी महिला ,भाविक व लहान मुले मनमुराद नाचुन आनंद घेत होते.यावेळी पन्नास हजार त्यावर भाविक आले होते. यावेळी खेड पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता. गावातील शिंदे पाटील, भगत, गुरव,वाघे वायकर ,भोई रौंधळ भालेकर. गोरगल्ले,अशा वेगवेगळ्या मानकर्यांना याठिकाणी पिढीजात मान आहे.

श्री खंडोबा देवाचे ठीक बारा वाजता भीमानदी तीरी अभ्यंगस्नान झाले व त्यानंतर तीन ठिकाणी विसावा घेऊन पालखीचे पुन्हा गडाकडे प्रस्थान झाली.पालखीबरोबर आईमाऊली मंडळाने खुप मोलाचे सहकार्य केले. खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष व संचालक मंडळ यासर्वांनी या ठिकाणी नियोजन केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!