चंद्रभागा नदीवरील शकुंतला रेल्वे पुलावर आगीचा भडका

दर्यापूर – महेश बुंदे

शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहाच्या सत्याग्रहीनी दि. २१ / ४ /२०२२ च्या रात्री अकरा वाजता आग विझविण्यासाठी,जीव धोक्यात घालून, प्राणपणाने प्रयत्न केले. म्हणून ११० वर्षे जुना पण ठणठणीत पूल वाचला, अन्यथा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अभ्यासनिय असलेला, अनेक उन्हाळे, पावसाळे, मोठे नदीचे पूर अनुभवलेला वैभवी पुल आगीत भष्मसात झाला असता रात्री साडेदहा अकराच्या दरम्यान, शकुंतला प्रेमी दिनेश पारडे यांचा फोन विजय विल्हेकर यांना आला, त्यांनी सांगितले

चंद्रभागा नदीवरील रेल्वे पुलाला आग लागली आहे, विजय विल्हेकर यांनी लगेचच मूर्तिजापूरचे रेल्वे पोलीस निरीक्षक सत्येंद्र यादव यांना माहिती दिली, त्यांनी लगेच टीम घेऊन निघतो म्हणाले, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांना कळविले, त्यांनी अग्निशमक दला सोबत संपर्क केला, अशा आपतकालीन परिस्थितीत अग्रेसर असणारे, आणि पुला नजीक बाग असणारे प्रदीप मलिये, कृष्णा मलिये यांना कळवताच ते वीस लिटरच्या पाण्याच्या कॅन डोक्यावर घेऊन, सहकाऱ्यांसह शुन्य मिनिटात हजर झाले, इतरही अनेक सत्याग्रही एका हाकेवर गोळा झाले, अंधारलेल्या उंच पुलावरून, डोक्यावर पाणी घेऊन, पुलाच्या शेवट पर्यंत चालत जाणे, जीवाची कसरतच होती. आग विझवतांना जी वाफ निघत होती, त्या वाफेने हात, पाय, अंग भाजत होते, त्याची तमा न बाळगता, जीवावर बेतून आग विझवली म्हणून ११० वर्षे अनेक उन्हाळे, पावसाळे,मोठे नदीचे पूर अनुभवलेला वैभवी पूल वाचला. नाहीतर अभियांत्रिकीचा अजोड नमुना, भस्मसात झाला असता.


रेल्वे पोलीस निरीक्षक सत्येंद्र यादव टीमसह युद्ध गतीने हजर झाले, आग विझवण्यासाठी मदत केली, अग्निशमन दल आले, पण पुलापर्यंत गाडी जात नसल्यान निष्फळ ठरले, डोक्यावरूनच पाणी नेने भाग पडले, बरे झाले सर्व वेळेवर धाऊन आल्याने मोठा अनर्थ टळला. भुसावळ रेल्वे विभागाचे पूल निरीक्षक, ज्यांनी शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रहात मुक्तपणे कार्य करता यावे म्हणून सेवानिवृत्ती घेतलेले,पूल तंत्रज्ञ मा रामदासजी चव्हाण व तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, रेल्वे पोलीस निरीक्षक सत्येंद्र यादव यांच्या देखरेखीखाली समिती गठन करून, आगीचे कारण शोधून, त्यावर उपाय योजना आखल्या जाणार आहे. तसेच युद्धपातळीवर रेल्वे पुलावरील लाकडी स्वीपर ला आग लागू नये म्हणुन, पूल तंत्रज्ञाणाचा सल्ला घेऊन,सिमेंट पाण्यात अग्निरोधक घटक वापरून, त्याचा लेप लावण्याचा सत्याग्रह, प्रदीप मलिये यांच्या नेतृत्वाखाली येत्या दोन दिवसात राविण्यात येणार आहे,व आग विझवणाऱ्या सत्याग्रही लोक अग्निशमन दलाचा यथोचित सत्कार घेण्यात येईल, असे विजय विल्हेकर यांनी सांगितले.


या आग विझवण्या प्रसंगी प्रदीप मलिये, कृष्णा मलिये, चेतन अग्रवाल, रमेश गुलवाडे, शाम पातूरकर, विनोद कपिले, शुभम बुराडे, सोनोने
मूर्तिजापूर रेल्वे पोलीस दलाचे पी आय सत्येंद्र यादव, निलेश पिंपळकर, विजय इंगळे, विपुल खंडारे, शशी जयस्वाल, सौ सिंधू विल्हेकर, वानखडे, विजय विल्हेकर इत्यादी सत्याग्रहीचा प्रामुख्याने सहभाग होता. रेल्वे प्रशासनाची, शकुंतला रेल्वे सुरू करण्या प्रतिची, सावत्र पणाच्या वागणुकीची, संपूर्ण जनमाणसात प्रचंड प्रक्षोभ, निंदा होत आहे. आणि जे सत्याग्रही लाकडे विझवण्यासाठी जिवाची परवा करत नाहीत, ते शकुंतला रेल्वे सुरु करण्यासाठी काहिही करू शकतात याचा प्रत्यय आला.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!