पावसाळा तोंडावर, तरी शहरातील मुख्य रस्त्यालगत नालीचे बांधकाम अपूर्णचं ,(आमदार बळवंत वानखडे या समस्याकडे पाहतील का)

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर शहरात अकोट रोडला सिमेंट काँक्रीटचे मोठे रस्ते निर्माण झाले आहेत, रस्ते निर्माण होऊन बराच कालावधी उलटल्या नंतरही शहरातील व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठान समोरील नाली बांधकाम रखडल्याने पाणी जमा झालेले आहे, जमा झालेल्या पाण्याच्या डबक्यात कीटक व मच्छरांची निर्मिती झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून रोगराई पसरण्याससाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे, सदर नाली बांधकाम हे या महिनाभरात पूर्णत्वास गेले नाहीतर लोकांच्या घरामध्ये व प्रतिष्ठानामध्ये पाणी जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, अर्धवट नाली बांधकामामुळे व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे,

लग्नसराई सुरू असताना ग्राहकांनी खरेदीसाठी धाव घेतली आहे परंतु पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहने अर्ध्या रस्त्यावर उभी करावी लागत आहेत त्या कारणाने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे, शिवाजी चौक ते बनोसा रोड, अकोट रोड वरील नाली बांधकामे त्वरीत पूर्ण करन्यासाठी ची आतुरतेने नागरिक व व्यापारी वाट बघत आहे, या ज्वलंत प्रश्‍नाकडे लोक प्रतिनिधींनी सुद्धा बघणे गरज निर्माण झाली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!