वडनेर गंगाई येथे तीव्र पाणीटंचाई उपसरपंच करणार जल त्याग आंदोलन

दर्यापूर – महेश बुंदे

उन्हाळा तीव्र होत असताना गावागावात पाणीटंचाई समस्या सुद्धा वाढत चालली आहे,वडनेर गंगाई येथे काही काही भागात पाच, सहा दिवस पाणी मिळत नाही, एवढच नाही तर त्यापेक्षा जास्त दिवस पाणी मिळत नाही, गावाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच यांनी मागे ३१ मार्चला आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते मात्र संबंधित अधिकारी आणि आमदार बळवंत वानखडे यांनी आठ दिवसात पाणी समस्या सोडविली जाईल असे आश्वासन दिल्याने तो आक्रोश मोर्चा रद्द करण्यात आला होता,

मात्र समस्यचे निवारण अद्याप पर्यंत झाले नाही, काही भागात आठ दिवस लागोपाठ पाणी मिळत नाही, त्यामुळे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, उपसरपंच सौ. मोहिनीताई चंद्रशेखर ह्या येत्या २५ एप्रिलला जलत्याग आंदोलन करणार आहेत, अशा प्रकारचे निवेदन मजीप्रा अधिकारी दर्यापूर, पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दर्यापूर तहसीलदार यांना दिले असून त्याचबरोबर २५ एप्रिलला मुख्य टाकी येथील जल त्याग आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले,

निवेदन देते वेळी सरपंच सौ. गोकरणा सुभाष इंगळे, उपसरपंच सौ. मोहिनी पाटील, किरण राजूरकर, रमेश चव्हाण, नितीन उमाळे, दुर्गा लाखे, सौ. लता कात्रे, गजानन नागोसे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने पाहिले नाही तर होणाऱ्या प्रकारास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया उपसरपंच मोहिनी यांनी दिली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!