“मनसोक्तपणे बरसणारा पाऊस” ही कविता ऐकू येणार साहित्य संमेलनात,ग्रामीण भागातील कवयित्री कु.आचल काळे हिला आले निमंत्रण

उदगीर येथे संपन्न होणार ९५ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन

दर्यापूर – महेश बुंदे

कवी,लेखक,साहित्यिक यांना आपली कला सादर करण्यासाठी अनेक कार्यक्रम,संमेलन ही संधी असते,लहान कार्यक्रम पासून सुरू झालेली प्रगती कधी तरी या मराठी भाषेतील सर्वात मोठे साहित्य संमेलन असणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचमध्ये आपल्याला संधी मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते. अशाच प्रकारे ग्रामीण भागातील युवा कवयित्री कु.आचल काळे हिला अखिल भारतीय साहित्य संमेलनात आपली मनसोक्तपणे बरसणारा पाऊस” ही कविता म्हणण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

उदगीर येथे संपन्न होणाऱ्या ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ती आपली रचना सादर करणार आहे,तसे पत्र तिला प्राप्त झाले,प्रसिद्ध,अनुभवी,जेष्ठ अशा साहित्यिक समोर कविता म्हणायची तिला ही सुवर्ण संधी मिळाली आहे.

कवयित्री कु.आचल ज्ञानेश्वर काळे (काव्यांचल) ही सोनोरी(ब) ता.मूर्तिजापूर जि.अकोला येथील रहिवासी असून दर्यापूर येथील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात ती बीकॉम शाखेत अंतिम वर्षाला शिकत आहे. कु.आचल काळे ही शब्दवेल साहित्य समूहाची सदस्य,युवती संघटन प्रमुख,शब्दवेल युथ विंग, आणि सह संचालिका मनस्पर्शी साहित्य परिवार म्हणून कार्य करत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता सादर करणे,हे माझं एक प्रकारे स्वप्न होत आणि गंमत म्हणून जेव्हा मी यावर्षीच्या संमेलनासाठी मी माझी कवीता पाठवली आणि खरचं अगदी मराठी नूतन वर्षाच्या दिवशी मला इतकी आनंददायी बातमी एका फोन कॉलद्वारे मिळाली आणि अतिशय आनंद झाला.

अशी प्रतिक्रिया तिने दिली. स्वतःच्या स्वप्नांना स्वतःच्या छंदाला जपताना जो आनंद मिळतो तो कुठेच नाहीये, म्हणून आपल्यातल्या कलागुणांना नेहमी जपायला शिकलं पाहिजे,असे तिने सांगितले. यावर्षी होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर करिता तिच्या “मनसोक्तपणे बरसणारा पाऊस” या कवितेची निवड झाली आहे.९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘ कवि कट्टा ‘मध्ये कविता सादरीकरणासाठी आयोजन समितीकडून रीतसर निमंत्रण आले आहे. या वर्षीचे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२,२३,२४ एप्रील ला लातूर उदगीर येथे आहे.

साहित्तीकांचा महाकुंभ म्हणून प्रसिध्द असलेल्या या समेंलनाला दिग्गज साहित्तीकांची उपस्थिती राहणार आहे. या उद्घाटनाला मा.खा.शरद पवार तर समारोपाला मार्गदर्शन महामहीम राष्ट्रपती मा. रामनाथ कोविंद, राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी जी तथा मा.मूख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब उपस्थित राहणार आहेत. तिच्या या निवडी बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!