दर्यापूर | ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा शिबिराचे थाटात उद्घाटन संपन्न

प्रबोधन विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर – रवी गणोरकर

दर्यापूर – महेश बुंदे

आजच्या मोबाईलच्या युगात विद्यार्थी मैदानापासून दूर गेला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे,त्यामुळे कमी वयात मुलांना आजार होतात,यापासून मुलांना वाचवायचे असेल तर त्याच्या मनामध्ये खेळाची आवड निर्माण झाली पाहीजे, व त्याची सर्वांगीण प्रगती व्हावी,याच उद्देशाने प्रबोधन विद्यालयाच्या वतीने ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा शिबिराचे आयोजन केले आहे,असे प्रतिपादन विदर्भ प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष रवी गणोरकर यांनी केले,ते ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दर्यापूरचे तहसीलदार योगेशजी देशमुख,ठाणेदार प्रमेशजी आत्राम,सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक अशोकराव हिरुळकर व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता हिरुळकर,महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर,उपप्राचार्य नरेंद्र गोंडाणे,उपमुख्याध्यापिका सौ. श्रीनाथ मॅडम,पर्यवेक्षक कु.भिसे व सौ.संत मॅडम आदी उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक अशोकराव हिरुळकर व त्यांच्या पत्नी सौ.सुनिता हिरुळकर यांनी विद्यालयाला ५०००० रू. देणगी देऊन त्यातून उत्तम साऊंड सिस्टिम निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार अध्यक्ष रवी गणोरकार यांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आला.


ग्रीष्मकालीन खेळ व क्रीडा शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार डॉ योगेश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,”विद्यार्थी जीवनात मोबाईलचा वाढता वापर ही एक समस्या निर्माण झालेली आहे, यातून विद्यार्थ्यांनी बाहेर यावे,क्रीडांगण आणखी गजबजून जावे यासाठी हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे”, असे याप्रसंगी त्यांनी प्रतिपादित केले.


तसेच दर्यापूरचे ठाणेदार श्री प्रमेशजी आत्राम यांनी ग्रीष्मकालीन शिबीर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे,सुट्ट्यांचा सदुपयोग करून उत्तम शरीर कमवावे असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय रेवस्कर यांनी दर्यापूरकरांचे प्रेम आणि विश्वास आज पर्यंत प्रबोधनवर आहे,हेच आमचे यशाचे रहस्य आहे. प्रबोधनाची परंपरा,संस्कृती ही कायम राहून समाजात समानतेची बीजे कशा पद्धतीने रुजतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू व्यवस्थापन मंडळ व माझा शिक्षक वर्ग हा एकजुटीने काम करतो हेच आमचे यश आहे.

असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले तसेच शिबीरामध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले प्रशिक्षक आम्ही या शिबिरार्थी यांना उपलब्ध करून देत आहोत,तरी दर्यापूरकरांनी या खेळमहोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन सरदार व आभार प्रदर्शन श्री. संजय मनोहरे यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात श्री जितेंद्र रापतीवार व संच यांनी सुरेल स्वागत गीत गाऊन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने झाली.यावेळी शिबिरार्थी सुंदर टी-शर्ट परिधान करून उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रशिक्षकांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शारीरिक शिक्षक श्री निखिल बुंदेले,लालसिंग राठोड, क्रांती गहरवाल,हरीश माहुरे,अंकुश धर्माळे व इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!