रामागड ते नांदरून रस्त्यावरील वृक्ष संपदा जळून खाक ; पर्यावरणप्रेमीची नाराजी, अज्ञातावर कारवाईची मागणी.

दर्यापूर – महेश बुंदे

जगभर सर्वत्र लोक झाडे लावण्यासाठी, जगवण्यासाठी धडपडतात. ती पर्यावरणाची आजची गरज आहे. परंतु दर्यापूर तालुक्यातील रामागड ते नांदरून आणि रामागड या रस्त्यावरील (दर्यापूर – करतखेड या नांदरून मार्गावर मात्र विपरीत घडत आहे. या रस्त्यावरील वाढलेली झाडे काही अज्ञात लोक पेटवून देत आहेत.

रस्त्याच्या बाजूचे शेतकरीच ही झाडे संपवण्यासाठी हे विघातक आणि पर्यावरण विरोधी कृत्य करीत आहेत असल्याचे तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी सांगितले. इतर कुठेच आग लागत नसताना, नेमक्या रस्त्याच्या कडेच्या झाडाभोवतीच का आगी लागाव्यात हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, खरे तर, पर्यावरणप्रेमी रामागडवासी आणि शासनाच्या अथक प्रयत्नांतून ही हिरवीगार झाडे वाढली होती.

त्यामुळे वाटसरुंना उन्हाच्या वेळी चांगला आसरा मिळत होता, तरी याला आळा घालण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग यांनी अशा विघातक प्रवृत्तींवर योग्य ती कारवाई त्वरित करावी, अशी मागणी तालुक्यातील वृक्षप्रेमी आणि पर्यावरण रक्षकांनी केली आहे. अन्यथा शासनाचा आणि समाजसेवकांचा “झाडे लावा, झाडे जगवा ” हा उपक्रम मातीमोल होऊन जाईल. उजाड, रखरखीत होत असलेला हा भाग आणखीच उजाड होईल अशी भीतीही व्यक्त करण्यात हेत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!