रुस्तमपूरच्या पंचशील बौध्द विहारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होणार विराजमान, ग्रामपंचायत उपसरपंच गणेशराव लाजूरकर यांचा कौतुकास्पद उपक्रम

दर्यापूर – महेश बुंदे

तालुक्यातील ग्रामपंचायत रुस्तमपूर-रामागड येथील पंचशील बौध्द विहारात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.त्यानिमित्ताने ग्रामपंचायत उपसरपंच गणेशराव लाजूरकर यांनी या पंचशील बौद्ध विहारामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे,तरी तो मी माझ्या स्वखर्चाने देणार आहे,असा संकल्प व्यक्त केला.त्याच्या या कार्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले.या कार्यक्रमाला गावकरी मंडळी उपस्थित होते. यासोबत येथील ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद शाळा रुस्तमपुर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून १३१ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी सरपंच सुषमाताई खडे,उपसरपंच श्री गणेशराव लाजूरकर,सदस्य सौ.वनमालाताई लाजूरकर,मीनाताई चव्हाण, राजूभाऊ चव्हाण,सौ.कविता रामागडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ खडे, शाळेचे मुख्याध्यापक पवार सर देशमुख सर,अंगणवाडी सेविका आशा वर्कर,गावातील बाळू पाटील लोडम ,केशवराव लोडम, अमोल लोडम, रविशंकर लाजूरकर ,प्रमोद लोणकर, उमेश लाजूरकर, गोपाल रामागडे, गौतम खडे, अजय खडे,किरण खडे, राजकुमार खडे, सचिन कवळे, भास्कर हागे, निवृत्ती ढवळे,गजानन कवळे आणि गावातील मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!