दर्यापूर – महेश बुंदे
मध्यरात्रीला विटा मातीच्या घराने पेट घेतला अन् होत्याच नव्हत झालं, आख्खा संसार जळून खाक झाला. अंगावरच्या कपड्याने त्यांचा संसार रस्त्यावर आला होता. विहिगाव (ता. अंजनगाव सुर्जी) ललिता वानखडे यांचे राहते घर आगीच्या भस्मसात पडले. अशावेळी दर्यापूर येथील कौसल्याबाई निवारा ट्रस्टचे अध्यक्ष रामुशेठ मालपाणी यांच्याकडून महिलांनी मदतीचा हात दिल्यावर पुन्हा या कुटूंबाला संसार उभे करण्याचे बळ मिळणार आहे. त्यांच्या या मदतीने मानवतेचे दर्शन घडले आहे.
