लोकशाहीतील संविधानिक मूल्य जोपासले पाहिजे – प्राचार्य डॉ आराधना वैद्य

अमरावती प्रतिनिधी – महेश बुंदे

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित नागरिकांची जबाबदारी या विषयवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आराधना वैद्य, प्रमुख वक्ते डॉ.बबिता येवले राज्यशास्त्र विभाग, प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय अमरावती
प्रमूख उपस्थिती डॉ.प्रशांत विघे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, डॉ. स्नेहा जोशी महिला कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना विचारपीठावर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय करून देताना डॉ. प्रशांत विघे म्हणाले की, भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० ला अमलात आल्यानंतर नागरिक म्हणून संविधानाचा भाग २ कलम ५ ते ११ मध्ये नागरिकत्वाच्या तरतुदीचा समावेश करण्यात आलेला आहे. नागरिक म्हणून मिळालेला अधिकार लोकशाही प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने महत्वाचे असून ती जबाबदारी तरुणांच्या आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आराधना वैद्य म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी आपण भारतीय नागरिक म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतावर चालणाऱ्या लोकशाहीतील संविधानिक मूल्य जोपासली पाहिजे. सोबतच भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारासोबत कर्तव्याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.बबिता येवले म्हणाल्या की, भारतीय लोकशाही नागरिकत्व जन्मताच प्राप्त होते. त्यामुळे देशाचा सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने वाहतुकीचे नियाम पाळणे, प्रत्येकामध्ये बंधूभाव निर्माण केला पाहिजे ,घर स्वच्छ ठेवणे, सर्वांशी आदराने वागणे, गरजेचे आहे परंतु भारतीयांना नियम पाळण्याची गरज का वाटत नाही ? वाहतुकीचे नियम, रांगेत उभे राहणे, कचरा न करणे, न थुंकणे, इत्यादी नियम का महत्वाचे वाटत नाहीत? नियम इतरांसाठी असतात, आपल्यासाठी नाही.. मीच का नियम पाळू ? तसेही, नियम पाळला नाही, एखादा कायदा मोडला तर शिक्षा कुठे मिळणार आहे? तर मग काय फरक पडतो मी नियम नाही पाळले तर? ही सर्व विधाने ‘नागरिक जाणिवेची’ आणि ‘नागरिक शिस्तीची’ उणीव दर्शवतात. कुठेतरी आपली शिक्षण व्यवस्था, आपली राजकीय व्यवस्था आणि नागरी समाज लोकांमध्ये चांगल्या नागरिकतेच्या मूल्यांचे महत्त्व सांगण्यात अपयशी ठरले आहेत का ? याचाही विचार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी डॉ. संग्राम रघुवंशी, डॉ. अनिल खांडेकर, डॉ. नितिन तट्टे,डॉ. संगीता देशमुख, डॉ.संगीता कूळकर्णी, डॉ. मीता कांबळे व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. काजल वैद्य, आभार डॉ. स्नेहा जोशी यांनी व्यक्त केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!