जिजाई प्रतिष्ठानचा विद्युत वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून विद्युत वितरण कंपनीकडून मध्यरात्री विद्युत पुरवठा हा चार ते पाच तास खंडित केले जात आहे, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरामध्ये लहान मुले व वृद्ध लोकांना या अतिरिक्त भार नियमनाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांना सुद्धा शेतीच्या कामाकरिता याची मोठी अडचण निर्माण झालेली आहे, विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारा विरोधात (दि.०८) शुक्रवारी जिजाई प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष विनय गावंडे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.

व संबंधित विद्युत वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले, सदर घटनास्थळी दर्यापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, येत्या दोन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कंपनीचे कार्यालय पेटून देण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी जिजाई प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. त्यावेळी शेकडो विजग्राहक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!