अखेर तोंगलाबाद येथील अशुद्ध पाणीपुरवठाची समस्या मिटली,जीवन प्राधिकरणच्या प्रयत्नाने लिकेज झाले दुरुस्त,गावकऱ्यांनी मानले कर्मचाऱ्यांचे आभार

दर्यापूर – महेश बुंदे

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने शहानुर प्रकल्पाच्या द्वारे तालुक्यातील तोंगलाबाद येथे अनेक वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा केला जातो.या पाईपलाईन द्वारे गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असताना,मात्र गेल्या दोन महिन्यांपासून अर्ध्या गावात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी गावकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आल्या होत्या.त्या बाबत वर्तमानपत्रातून बातमी प्रकाशित झाली होती. या पाईप लाईनद्वारे येणाऱ्या या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी वास येतो होता, या पिण्याच्या पाण्याचा रंग सुद्धा गढूळ होता,यामुकळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते.


त्यामुळे या तक्रारीची व बातमीची दखल घेत मजीप्रा’ कार्यालयाचे कर्मचारी यांनी १५ दिवस पासून कठोर मेहनत घेऊन अशुध्द पाणीपुरवठा होत असलेले लिकेज शोधले त्यामुळे आता गावात शुध्द पाणीपुरवठा होत असून गावकऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!