महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उठले तोंगलाबाद गावकऱ्यांच्या जीवावर,महिन्यापासून गावात अशुद्ध पाणी, तरी लिकेज सापडेना

गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात, कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने शहानुर प्रकल्पाच्या द्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनेच्या माध्यमातून घरोघरी नळ कनेक्शन देण्यात आले आहे.
या जीवन प्राधिकरणचा भोंगळ कारभार तालुक्यातील तोंगलाबाद येथे उघडकीस आला आहे. जीवन प्राधिकरण कार्यालय तोंगलाबाद गावकऱ्यांच्या जीवावर उठले की काय असा प्रश्न उपस्थित होते आहे.


येथे गेल्या महिन्यापासून अर्ध्या गावात अशुद्ध पाणी पुरवठा होत असून या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वास येतो आहे,या पिण्याच्या पाण्याचा रंग सुद्धा गढूळ आहे, याबाबत गावकऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तक्रार केली असून या कार्यालयाचे कर्मचारी दररोज गावात येऊन लिकेज शोधण्याचा थातुरमातुर प्रयत्न करतात,पण त्याना अजूनही लिकेज सापडले नाही,त्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून,तीन दिवसांत ही समस्या दूर करा,अन्यथा दर्यापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा तोंगलाबाद वासीयांनी दिला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!