अनेक जण राहताहेत पडक्या घरात तर अनेकांचे संसार फाटक्या झोपडीत
दर्यापूर – महेश बुंदे
अन्न, वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहे.भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घरकुल मिळावे,यासाठी प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना, शबरी योजना अशा योजनेच्या माध्यमातून घरकुल योजना दर्यापूर तालुक्यात राबविल्या जात आहे.

पण या घरकूल योजनेचा लाभ देताना मोठ्या प्रमाणावर तफावत आढळुन येत असल्याचे पहायला मिळते. अशाच प्रकारे तालुक्यातील सामदा येथे घरकुल लाभापासून खरे लाभार्थीच वंचित असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.सामदा येथे गरजू लाभार्थी असतांना त्याना अजून पर्यंत अनेक जण वंचित असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक दिवस पडक्या घरात राहतात,गावातील अनेकांचे संसार फाटक्या झोपडीत सुरू असून याकडे दर्यापूर पंचायत समितीचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.
त्यामुळे या सामदा गावातील नागरीक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे पहावयास मिळते आहे.या सामदा गावात घरकुल न मिळालेले एकूण ६५ लाभार्थी वंचित असून ते लाभार्थी दर्यापूर पंचायत समिती आवारात आंदोलन करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरापासून घरकुल प्रश्र्नाकरीता गावकरी प्रशासनाला मागणी करीत आहेत , यासंबधी निधी सुध्धा शासनाकडून प्राप्त आहे मात्र आपल्या जवळच्या लोकांना केवळ घरकुल यादीत स्थान देण्याचा करंटेपणा होत आहे , ज्यांना खरी गरज आहे त्यांना डावलून घरकुल यादी बनविण्यात आली आहे , आम्ही गटविकास अधिकारी याना अनेकवेळा याविषयी अवगत केले मात्र काहीच निष्पन्न झाले नाही आता आंदोलनाशीवाय पर्याय नाही
प्रभाकर चोरपागर, सामाजिक कार्यकर्ते सामदा घरकुल समंधातील यादी मधे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची नावे घेतली आहेत, जे राहिले असतील त्यांचा सर्व्ह करून त्यांनाही लाभ देण्यात येईल कोणत्याही लाभार्थ्याला घरकुल पासून वंचित ठेवणार नाही असाच प्रशासनाचा प्रयत्न आहे ,
दिनेश टोळे
ग्रामविकास अधिकारी, प. स. दर्यापूर