इंद्रायणी नदीवरील ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण

प्रतिनिधी सुनील बटवाल

चिंबळी  दि२६( वार्ताहर) इंद्रायणी नदीवरील मोशी चिंबळी हद्दीत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वतिने गेल्या ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून बंधाऱ्यात तीन ढापे टाकत पाणी साठवणूक करण्यात आली असल्याची माहिती मोशी पाठबंधारे शाखेचे शाखा अभियंता किशोर चव्हाण यांनी दिली आहे.


 दुरुस्तीसाठी बंधारा फोडण्यात आल्याने गेल्या सात – आठ महिन्यांपासून पाणी साठवणूक बंद होती.त्याचा परिणाम येथील शेती व,विहिरी,कूपनलिका यांच्या पाणी पातळीवर झाला होता.नदी काठच्या मोशी,चिंबळी गावांना यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता.या भागात टँकर मागणी देखील वाढली होती आता मात्र बंधारा दुरुस्ती झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार असून बंधाऱ्यातून होणारी पाणी गळती देखील थांबणार आहे.शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर काम पूर्ण झाल्याने येत्या काळात बंधाऱ्यात पाणी उपलब्ध राहणार आहे.कित्येक वर्षांची बंधारा दुरुस्तीची मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे.नदीला जलपर्णीचे कायमस्वरूपी ग्रहण लागल्याने पाण्याचा वापर कमी झाला आहे.मात्र शेती आणि भूजल पातळीसाठी नदीच्या पाण्याचा वापर होत आहे.नदी प्रदूषणावर उपाय झाल्यास येत्या काळात हा बंधारा जलविहार साठी लाभदायी ठरू शकतो.सदर बंधाऱ्याचे काम दोन ते तीन वेळा रखडले होते.याबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध करत दै.पुढारीने  विषयाला वाचा फोडली होती.या वृत्ताची दखल घेत नागरिकांच्या मागणीचा विचार करत विभागाने कामास पुन्हा प्रारंभ केला आणि काम फेब्रुवारी अखेर पूर्ण झाले.सदर काम पूर्ण झाल्या बद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!