प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी -ओम मोरे पर्यावरणप्रेमी

आगामी दिवाळी हा सण प्रदूषण मुक्त पद्धतीने साजरा करावा असे आवाहन पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत अमरावती जिल्हा युवाअध्यक्ष तथा पर्यावरण अभ्यास ओम किशोर मोरे यांनी पत्र काव्याने यांनी केले आहे.

दिवाळी प्रकाशाचा उत्सव असून तो कोणताही ध्वनी अथवा ध्वनी प्रदूषणाविषय साजरा केला जावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दिवाळी सणा निमित्त प्रदूषण होण्याचे मुख्य कारण म्हणजे फटाके असून दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वानाला त्रास होतो तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडते, वन्य जीवांना हानी होतात. दिवाळीमध्ये प्रदूषण वाढल्याने पर्यावरण संतुलन बिघडते आणि वेळेवर पाऊस न येणे, उष्णता वाढणे असे काही मोठे संकट आपल्यासमोर येऊ शकतात.

कोरोनाच्या आजारात श्वासाचा त्रास हे मुख्य लक्षण होते. यंदाची ही दिवाळी फटाकेमुक्त असावी, पर्यावरण संवर्धनाचे असावी. फटाके फोडणे टाळावेत. त्याऐवजी गरजू व्यक्तींना मदत करून दिवाळी साजरी करावी असे आव्हान ओम मोरे यांनी केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!