सोयाबीनच्या अनेक शेतात अजूनही पाणी साचलेलेच, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया थंड बस्त्यातच

अमरावती वार्ता :- बेबळा नदीच्या किनाऱ्यावरील अनेक शेतात अजूनही पाणी साचलेलेच आहे. त्यामुळे उरलेसुरले सोयाबीन काढण्याचे कामाला विलंब लागत आहे. फुबगाव फाट्याजवळच्या मुंडनिशांकराव महसुली भागातील मुरलीधर सोनबाजी मुके यांच्या शेत सर्वे नंबर २४/२ मधे अजूनही पाणी साचलेले आहे.

शेतात साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ


त्यामुळे त्यांचे थोडेफार राहिलेले सोयाबीन काढण्यासाठी त्यांना अजूनही विलंब लागत आहे.
हीच अवस्था या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आहे. महापुरामुळे नदी परिसरातील संपूर्ण जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे हजारो हेक्टर परिसरातील जमीन व पिक उद्ध्वस्त झाले आहे.
याबाबत महसूल व कृषी विभागाने सर्वे केल्याचे सांगितले जात असले तरी, त्यांना शासनाची अजूनही मदत मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे.


पिक विमा कंपनीने याबाबत सर्वे करून तातडीने पिक विमा देण्याबाबत पावले उचलली नाहीत.त्यामुळे शासन व पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना किती दिवस वाऱ्यावर सोडणार? असा प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.याबाबत त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. हरभऱ्याचे बियाणे व इतर रब्बी पिकाचे बियाणे सर्व गरजवंत शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात यावे व शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
प्रतिनिधी :- रवि मारोटकर (ब्युरो चीफ
)

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!