वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार,शेलुबाजार परिसरात विजेचा लपंडाव सुरुच,परिस्थीती सुधारावी सरपंचाची मागणी

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अनियमित वीज पुरवठयामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत,वारंवार तक्रारी देऊन सुद्धा वीज वितरण कंपनी द्वारे कोणत्याही प्रकारची सुधारणा किंवा दखल घेण्यात आली नाही.विजपुरवठा सुरळीत करावा आणी ग्राहकांना होणारा ञास थांबवावा अशी मागणी सरपंचा प्रमिलाताई पवार यांनी सबंधित प्रशासनाला केली आहे.


शेलुबाजार परिसरात गेल्या काही दिवसापासुन विजेचा लपंडाव सुरु असुन अनियमित विद्दूत पुरवठा होत असल्याने नाहक लोकांना ञास होत आहे.सध्या ऊन्ह्याळ्याचे दिवस असल्यामुळे विज पुरवठा खंडित होत असल्याने मोठा ञास होत आहे.आॅनलाइन सेवाही खंडित होत आहेत. गावातील जीर्ण झालेले विद्युत पोल बदलून द्यावे,लोंबकळत असलेल्या विद्युत तारा व्यवस्थित कराव्या,विजेचा अतिरिक्त भार वाढल्यामुळे वेगळे रोहित्र शक्य असल्यास त्याचीही व्यवस्था करावी,अशी मागणी सरपंचा प्रमिलाताई पवार यांनी प्रशासनाला केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!