घराचे नुकसान झालेल्या एरंडगाव येथील ‘त्या’ कुटूंबाला अन्नधान्य किट

आमदार बळवंत वानखडे, समाजसेवक रामुशेठ मालपाणी यांचा पुढाकार

दर्यापूर – महेश बुंदे

एरंडगाव येथील रत्नदीप उमाळे यांच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या वेळी घरातील बहुतांश वस्तूंचे नुकसान झाले. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. आग काही काळाने शांत झाली खरी, पण बरंचस नुकसान करून गेली. अशा वेळी समाजसेवकात असलेली माणुसकी पुन्हा एकदा दिसून आली.

आमदार बळवंत वानखडे, समाजसेवक रामूसेठ मालपाणी यांच्या लक्षात आलं, की या कुटूंबाच्या घरात मोठी कमाई करणारं असं कोणी नाही. तसंही आग लागल्यामुळे नुकसान झालं की किती भुर्दंड पडतो हे आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल किंवा कदाचित स्वतःच्या उदाहरणावरून अनुभवलं ही असेल.

तसेच त्या कुटूंबात वृद्ध महिला स्वतः काबाड कष्ट करून दैनंदिन जीवन व्यतीत करतात लक्षात आल्यावर आमदार बळवंत वानखडे समाजसेवक रामूशेठ मालपाणी, इंजी. नितेश वानखडे, संदेश कुऱ्हाडे, अरविंद नगरे, पोलीस पाटील प्रतीक वानखडे यांनी पुढाकार घेत या कुटूंबाला पुरेल असं धान्य देऊ केलं.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!