चाकण | कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणा-या पाच जणांवर गुन्हा दाखल

पुणे वार्ता :- कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणा-या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) सकाळी पुणे जिल्ह्यातील चाकण मध्ये चाकण मार्केटयार्डमधील जनावरांच्या बाजारात घडली.

यात आरोपी इसम नामे -१) नाथा प्रभू कोळेकर, २) रशिद महम्मद काझी, ३) संतोष लक्ष्मण शिंदे, ४) सलमान मुस्तफा शेख, ५) गुलाब रसूल शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यां आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी निलेश विजय चासकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चाकण येथे जनावरांचा बाजार भरतो. आरोपींनी त्यांच्याकडील चार वाहनांमध्ये या जनावरांच्या बाजारातून पाच भाकड गाई दोरीने बांधून भरल्या. त्यांच्या चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. विनापरवाना, असुरक्षितपणे आणि क्रूरपणे जनावरांना वागणूक देऊन त्यांना कत्तलीसाठी नेताना आरोपी पोलिसांना आढळून आले

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!