नांदगाव (खं) / ओम मोरे
नांदगाव (खं) :- एकीकडे आजादीच्या अमृतमहोत्सवा निमित्त देशात सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छतेचे धडे दिले जाते आहेत पण नजीकच्या शिरपुर येथे गल्लोगल्ली आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पाहावयास मिळते आहे.

गावात सर्वत्र गटारी तुंबल्याने नाल्यातील उग्र वासाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले जाते पण त्यांनी दिलेल्या स्वच्छतेची शिकवणीचा ग्रामपंचायतीस विसर का होत आहे असा सूर नागरिकाद्वारे व्यक्त केला जातो आहे.
