मिरचीची शेती व जीवनात गोडवा…!

दर्यापूर – महेश बुंदे

नजीकच्या कोकर्डा येथील बहुतांश शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाला पिकाकडे वळले आहे. कोकर्डा अंतर्गत येत असलेल्या रामपुरा येथील रवी उपाध्ये या शेतकऱ्यांने आपल्या दीड एकरच्या शेतात मिरची पिकाची लागवड केली आहे. शेतजमिनीत दरवर्षी नवनवीन प्रयोग आपल्या कल्पनेतून करण्याचे धाडस ते दाखवितात. यावर्षी त्यांनी आपल्या दीड एकरात मिरची पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना २ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला.

मिरची पिकाची चांगली देखभाल करून काळजी घेतल्यामुळे जवळपास २०० क्विंटल उत्पादन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस युवा पिढी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित आहे. मात्र काही मोजके सुशिक्षित युवा शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करीत आहे. यामध्ये रवी उपाध्ये हे एक आहेत. शेतकऱ्यांनी धानपिकासोबतच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची शेती केल्यास शेती व्यवसाय फायदेशिर ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!