खळबळजनक घटना ; विवाहित प्रेमयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या

प्रतिनिधी ओम मोरे

अमरावती- विवाहित प्रेमयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या केली.ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी १० वाजता अकोला मार्गावरील अचलपूर तालुक्यातील येणी पांढरी येथिल एका शेतशिवारात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी परतवाडा येथिल पोलीस पोहचले असून फाॅरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले आहे.सुधीर रामदास बोबडे (वय४८) वनश्री काॅलनी कांडली व अलका मनोज दोडके (वय४८) रामनगर कांडली अशी चाकूने वार करीत आत्महत्या करण्याऱ्या विवाहित प्रेमी युगुलांची नावे आहेत.

दोघेही मंगळवारी दि. २२/२/२०२२ दुपारपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी १०वाजता च्या दरम्यान येणी पांढरी येथिल राकेश अग्रवाल यांच्या शेतातील खोलीत दोघांचे मृतदेह एकमेकाला आलिंगन घातलेल्या अवस्थेत दिसून आले.मृत्यूदेहाजवळ चायना चाकू आढळून आला. त्यामुळे चाकूने ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी अचलपूर चे उपविभागीय अधिकारी गोवर हसन परतवाडाचे ठाणेदार संतोष ताले व कर्मचारी पंचनामा व इतर माहिती घेत आहे. सदर विवाहित प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली आहे की हत्या आहे हा सध्या संभ्रम असून तो पोलिसांनी दूर करावा. हत्या की आत्महत्या याविषयी नागरिकांमध्ये वेगळी चर्चा चालू आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!