शिवजयंतीनिमित्त अयोध्यानगरातील दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम – रयतेचे राजे, स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी स्थानिक अयोध्यानगर येथे नवयुवकांच्या सहभागातून साजरी करण्यात आली. यावेळी सामाजीक उपक्रम म्हणून नगरातील दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ.सौ. जयश्री गुट्टे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून भानुदास गोटे, प्रकाश गोटे, अमोल पळशीकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. नंतर सर्वानी शिवरायांना अभिवादन केले. जयंतीनिमित्त सामाजीक उपक्रम म्हणून अयोध्यानगर येथील दत्त मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या वृक्षांचे संवर्धन व संगोपनासाठी रोपट्यांना लोखंडी जाळी लावण्यात आली. यावेळी लिंब, अशोका, उंबर, बेल आदी वृक्ष लावण्यात आले.

कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन निखिल सदावते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश ठाकरे, गजानन मगर, पंकज खंडारे, विनोद आदमने, सचिन राठोड, अक्षय अंभोरे, रवी पाचपिल्ले, संतोष घुगे, प्रशांत धुळधुळे, मारोती महल्ले, संघपाल वानखेडे, नर्मदा इंगळे, दत्ता केंद्रे, अविनाश केंद्रे, आकाश मुसळे, सुधाकर मुसळे, अविनाश खंडारे, उमेश ठाकरे, योगेश काळीणकर, गोदाबाई हनवते, गजानन हनवते, रवी खडसे, प्रमोद येवले, ज्ञानेश्वर कोंगे, जया येळणे, शोभाबाई धवसे, भिमराव इंगोले, रामा शिंदे, विलास गिरी, संतोष उगले, आकाश इंगोले, उमेश जाधव, किरण रोताळे आदी युवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!