छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा संपन्न ; संभाजी ब्रिगेड ने केले होते आयोजन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-रिसोड येथील राजस्थान माध्यमिक महाविद्यालयांमध्ये संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व तसेच संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अमित खडसे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अर्जुन खरात तालुका अध्यक्ष गोपाल खडसे व नगर परिषद आरोग्य व शिक्षण सभापती संतोष च-हाटे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पी डी पाटील, म. पत्रकार संघाचे विवेकानंद ठाकरे डॉ असोसिएशनचे अध्यक्ष अजय पाटील व तसेच जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन देशमुख,रुपेश बाजड हे होते प्रसंगी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व तसेच संत रोहिदास महाराज राष्ट्रमाता जिजाऊ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विविध मान्यवरांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला तदनंतर विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होऊन हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा 16 फेब्रुवारी रोजी पत्रकार कार्यालय रिसोड या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजड यांनी केले तर आभार प्रदर्शन राजस्थान माध्यमिक महाविद्यालय चे मुख्याध्यापक विवेकानंद ठाकरे यांनी मानले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!