नरसिंगपूर – उमरी रस्ता बनला अपघात प्रवण स्थळ, दुरूस्तीची मागणी ; प्रहारच्या वतीने आमदार बळवंत वानखडे यांना निवेदन

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यातील नरसिंगपूर ते उमरी गावाला जोडणारा रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून यामध्ये नेहमीच अपघात होत आहे. यामुळे हा रस्ता अपघात प्रवण स्थळ बनला आहे, तरी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील प्रहार शाखेच्या वतीने दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित प्रहार शाखा प्रमुख गायत्री राम बायस्कार, प्रहार सचिव राम पाटील बायस्कार व प्रहार कार्यकर्ते आदित्य बायस्कार आदी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!