प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-राजमाता माॅसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून समृद्ध गाव स्पर्धेमधील जोगलदरी येथे दीन दयाल सेवा प्रतिष्ठान यवतमाळ व कामधेनू गोरक्षण व अनु संशोधन केंद्र यांच्या वतीने सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या ऊपस्थीतीत ही कार्यशाळा मोठ्या ऊत्साहात पार पडली.
रासायनिक खताचा होत असलेला बेसुमार वापर यातून खालावलेला मातीचा दर्जा यावर सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा बेसुमार वापर थांबवून सेंद्रिय शेतीकडे जाणे ही काळाची गरज आहे तसेच या सेंद्रिय शेती विषयीचे फायदे शेणाचा उपयोग त्यापासून गांडूळ खत तयार करणे जीवामृत गो अर्क वर्मी वाश तसेच पूर्वीची नैसर्गिक पद्धतीने केली जाणारी शेती व आजची शेती याविषयीची माहिती या कार्यशाळांमध्ये देण्यात आली.
