गुन्हा दाखल करण्याची धमकी देत उकळली खंडणी. तोतया तीन प्राणिरक्षकांना चाकण पोलिसांकडून अटक

चाकण वार्ता :- खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तिघांनी मिळून एका व्यक्तीकडून दोन हजार रुपये खंडणी उकळली. या प्रकरणी व्यक्तीच्या तक्रारीवरून तिघांना अटक करण्यात आली आहे.ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास चाकण येथील जनावरांच्या बाजार रोडला घडली.

निलेश भरत कुचेकर, राहुल शंकर पारवे, सुदर्शन उर्फ गुड्या सुनील आरकडे (सर्व रा. महात्मा फुले नगर, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अतुल दिलीप राऊत (वय 36, रा. नेरळ, ता. कर्जत) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अतुल राऊत हे चाकण येथील जनावरांच्या बाजारातून त्यांच्या टेम्पो MH05 -DK5066 यामध्ये तीन वासरे भरून घेऊन जात होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘आम्ही प्राण्यांचे बजरंग दल गोरक्षक चे कार्यकर्ते आहोत. तुम्ही ही वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची केस तुमच्यावर करतो’, अशी आरोपींनी दमदाटी केली. तसेच केस न करण्यासाठी दोन हजार रुपयांचा हप्ता मागितला. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून दोन हजार रुपयांची खंडणी घेतली. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. पोलीस हवालदार हांडे,चाकण पोलीस स्टेशन तपास करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!