…त्या आगरातून जाणारी ‘लालपरी’ दीड महिन्यांनी पुन्हा धावली.

दर्यापूर – महेश बुंदे

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या एसटीच्या विलगीकरण संबंधातील आंदोलनाला जवळपास दोन महिने झाले आहेत. या काळामध्ये संपूर्ण एसटी बस ठप्प पडली असून खाजगी वाहतूक सुरू आहे. दर्यापूर एसटी आगाराचे आहे, सर्व बसेस गेल्या दोन महिन्यापासून आगारातच उभे आहेत, या स्थितीत दिनांक ९ जानेवारीला सकाळी ९ वाजता दर्यापूर एस. टी. डेपो मधून दर्यापूर ते नागपूर पहिली एसटी बस सोडण्यात आली.

याकरीता एसटी आंदोलनातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटी विभागाने पोलीस बंदोबस्त सुद्धा लावला होता, सकाळी ९ वाजता पहिली एसटी बस सोडताना एसटी आगाराचे आगार प्रमुख पवन लाजूरकर, एसटीचे अधिकारी उईके, वानखडे पोलीस उपनिरीक्षक, नितनवरे, व पोलीस शिपाई यांच्या उपस्थितीमध्ये पहिली एसटी सोडण्यात आली यामध्ये एकूण १४ प्रवासी होते. आंदोलनातील काळानंतर पहिल्यांदा दर्यापूर आगारातून एस.टी बस सुरू झाल्याने प्रवाशांनी एसटीला धन्यवाद दिले असून आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी मात्र या प्रयत्नांवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना बाहेर गावावरून चालक-वाहक बोलावून एसटीने जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याची टीका एसटी आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!