राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात कडक निर्बंध लागू करत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा अत्यावश्यक कामाशिवाय ५ पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. तसेच दोन लसीचे डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहनातून प्रवास करता येणार आहे. २४ तास कार्यरत असणाऱ्या अस्थापनांना अत्यावश्यक सेवेत मोडण्यात आले आहे. दरम्यान लोकलबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारासुद्धा मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला आहे. खाजगी कार्यालयांतही ५० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे. तसेच व्यायाम शाळा, स्पा,स्विमींग पूल बंद ठेवण्याचे निर्देश नियमावलीमध्ये देण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये काय बंद आणि काय चालू ते .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे नेमके नियम कोणते?
- पूर्वनियोजित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार
-एमपीएससी, युपीएससीच्या परीक्षांना परवानगी असेल
- रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल, या वेळेत कोणालाही फिरता किंवा प्रवास करता येणार नाही. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असेल.
- जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांना कोरोना नियमांचे पालन करुन परवानगी असेल. तसेच विना प्रेक्षक परवानगी देण्यात आली आहे.
- सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह राजकीय कार्यक्रमांना परवानगी असेल.
- आंतरराष्ट्रीय प्रवास केंद्राच्या परवानगीप्रमाणे होणार आहे.
- राज्यांतर्गत प्रवासासाठी आरटीपीसीआर चाचणी ७२ तासात केलेली असावी. तसेच त्याचा अहवाल निगेटिव्ही असणं बंधनकारक आहे.
राज्यात काय सुरु राहणार ?
- हॉटेल, रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार केवळ ५० टक्के आसन व्यवस्था ठेवण्यात येणार
- शॉपिंग मॉलमध्ये ५० टक्के क्षमता बंधनकारक
- चित्रपटगृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार
- पहिल्या लाटेत सलून बंद असल्याने नुकसान झाले होते. यामुळे आता ५० टक्के क्षमतेनं सलून सुरु ठेवण्याची परवानगी (रात्री 10 ते सकाळी 7 काळात हेअर कटिंग सलून बंद राहतील.)
शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये मर्यादित प्रवेश. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश
रेस्टॉरंट्स आणि उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सुरू. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
अन्नपदार्थांची होम डिलीव्हरी सुरू राहणार.
UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सूचनांनुसार होणार.
काय बंद राहणार ?
- राज्यातील सगळ्या प्रकारची पर्यटन स्थळं बंद ठेवण्यात येणार
- स्विमींग पूल, व्यायाम शाळा आणि स्पा १०० टक्के बंद राहणार
- मैदान, संग्रहालये, बाग, प्राणी संग्रहालय, गडकिल्ले पर्यटकांसाठी बंद असतील
- शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
एन्टरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम, किल्ले आणि तिकीट लागणाऱ्या इतर सार्वजनिक जागा बंद. - लग्न कार्यासाठी ५० लोकांची उपस्थिती असणे बंधनकारक
- अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना परवानगी
- सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांची उपस्थिती असेल.
● डोमॅस्टिक फ्लाईट्ससोबतच ट्रेन, रोड-वे ने राज्यात प्रवास करत यायचे असल्यास संपूर्ण लसीकरण किंवा आरटीपीसीआरचा निगेटीव्ह रिपोर्ट 75 तासांपूर्वीचा बंधनकारक आहे. ड्रायव्हर, क्लीनर आणि स्टाफला देखील नियम लागू आहेत. धार्मिक स्थळांबाबत मात्र नियमावलीत कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही.