प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-घरोघरी शौचालयाची उभारणी करुन गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले, आता टप्पा 2 मध्ये स्वच्छतेच्या ईतर घटकावर कामे करणे अक्षित आहे. त्यामुळे गावाच्या शाश्वत स्वच्छतेचा पासवर्ड ग्रामसेवकाच्या हाती असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत हागणदारीमुक्त अधिक (ओडिएफ प्लस) बाबत जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्राम पंचायत आॅपरेटर यांच्या दोन दिवशिय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नियोजन भवन येथे करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते.
यावेळी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन वेले, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल साळुंखे, मुंबई येथील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांची उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी गावातील स्वच्छता आणि पाणी पुरवठा याबाबत जिल्ह्यातील परिस्थितीचे अवलोकन केले. जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडुन 100 कोटी रुपयाचा निधी आणल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. गावाच्या सरपंच व ग्रामसेवकांनी पुढाकार घेतल्यास जल जीवन मिशनच्या माध्यमातुन महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरेल. स्वच्छता व पाणी याबाबत केलेल्या कामाचे दस्तावेजीकरण (डाॅक्युमेंटेशन) करणे आणि ते संकेत स्थळावर म मोबाईल अॅपवर अपलोड करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगुन चंद्रकांत ठाकरे म्हणाले आपले विदर्भातील लोक नेहमी कामे खुप करतो पण ते दाखवत नाही, त्यामुळे आपण ऑनलाईनमध्ये मागे राहतो.
