चांदूर रेल्वे शहरातील जि.प.शाळेत तब्बल ३३ वर्षांनी पुन्हा भरली शाळा,शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा

तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करून केली कृतज्ञता व्यक्त

चांदूर रेल्वे प्रतिनिधी सुभाष कोटेचा /धीरज पवार

चांदूर रेल्वे शहरातील जि. प. शाळेत तब्बल ३३ वर्षांनी सर्व शालेय मित्र एकत्र आले व पुन्हा एकदा शाळा भरली होती. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला व तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

एकमेकांचे बदलले चेहरे, राहणीमान आणि बोलीभाषा याचं निरीक्षण करीत तब्बल ३३ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या बालपणातील आठवणीने अनेकांची डोळे आनंदी अश्रूंनी भरून आले. चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये १९८४ ते १९८८ या कालावधीत पाचवी ते दहावी वर्गापर्यंत सोबत शिक्षण घेणारे वर्गमित्र दहावीच्या परीक्षेनंतर वेगवेगळ्या क्षेत्रात स्थायिक झाले. कुणी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी, परदेशात गेले तर कुणी स्वतःच्या व्यवसायात, नोकरीत सक्रिय झाले.

त्या काळात मोबाईल अथवा फोनची अशी काही सोय नव्हती. त्यामुळे नंतर कोण कुठे स्थायिक झाले याची कोणतीही माहिती वर्गमित्रांना नव्हती. परंतु पेशाने डॉक्टर असलेले दिनेश ठाकरे यांच्या मनात सर्व मित्र एकत्र येण्याचा विचार आला आणि त्यांनी ही गोष्ट शालेय जुना मित्र देवेंद्र खैर जे पेशाने शिक्षक आहे त्यांच्याजवळ म्हणून दाखविली. यानंतर दोघेही कामाला लागून एक – एक शालेय मित्रांचे मोबाईल नंबर गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एक व्हाट्सअप ग्रुप बनविला. या कामासाठी मुकेश सूर्यवंशी, असलम शहा व इतरांनी त्यांना मदत केली. सर्व वर्ग मित्रांना व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन केल्यानंतर गेट-टुगेदर कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरले. यानुसार तीन दिवसीय “दिल दोस्ती दुबारा – ८८” हा गेट-टुगेदर कार्यक्रम घेण्यात आला.

यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच खेळ, गप्पा, मस्ती करण्यात आली. यानंतर सर्वांनीच चांदूर रेल्वे येथील जिल्हा परिषद शाळेत येऊन आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तसेच मागील ३३ वर्षाच्या काळातील आपापल्या आयुष्यातील सुखदुःखाचे प्रसंग यावेळी एकमेकांशी शेअर केले.

यानंतर शिक्षणाच्या वेळी ज्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले असे श्री आगरकर सर, श्री हांडे सर, श्री दुबे सर, श्रीमती कुंभारे मॅडम, श्री तेरसे सर, श्री चोरे सर, श्री सोरगिवकर सर व श्री चोहटकर सर या शिक्षकांना निमंत्रित करून त्यांचा शाळेत शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल गुल्हाने, अविनाश टाकळे, प्रसाद वानखडे, राजेश चौधरी, अजिज पठाण, मनोज शिंदे, प्रवीण देशमुख, प्रशांत कातकिडे, देवानंद जोल्हे, नंदू लंगडे, मनोज मिसाळ, प्रफुल वऱ्हाडे, रजेसिंग जाधव, प्रेमसिंग जाधव, असलम शहा, अनिरुद्ध खडसे, नरेंद्र मेश्राम, रुपाली जगताप, रंजना ठाकरे, अर्चना खंडार, ज्योती देशमुख, सुरेखा अर्जापूरे, वनिता गोठाणे, मनीषा आळसी, मनीता सुराना, प्रज्ञा अमीन, संगीता जावरकर, संजय बाबर, मिलिंद शेंडे, नंदू गुजर, उज्वल सोनोने, संजय डोंगरे, नंदु अडसड, विजय चव्हाण, अरूण शेंद्रे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!