नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला घरकुल योजनेचा पडला विसर, लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष

शेकडो लाभार्थी अर्धवट लाभापासून वंचित नवीन घरकुलाचे प्रस्ताव थंडबस्त्यात

रवी मारोटकर ब्युरो चीफ

येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिल्या जाणारे घरकुलाचे पहिल्या टप्प्यातील बाकी असलेले 110 घरकुलाचे अनुदान 1लाख 50 हजार रुपये न दिल्याने घरकुल धारकांचे घरकुले अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत.

तर दुसरीकडे 400 च्या जवळपास घरकुलाचे मंजूर असलेले नवीन प्रस्ताव शासनाकडे धूळ खात पडलेले आहेत. त्यामुळे येथील सर्वसामान्य,गोरगरीब घरकुलाचे स्वप्न बघणाऱ्या जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत झालेल्या आंदोलनाचा प्रशासनावर कोणताच परिणाम झाला नाही. इतर नगरपंचायत, नगरपरिषद मध्ये घरकुलाचे अनुदान प्राप्त झाले असून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत मध्ये मात्र अक्षम्य दुर्लक्ष केलं जात आहे.
याबाबत आमदार प्रताप अडसड व माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रकर्षाने लक्ष न घातल्यामुळे येत्या निवडणुकीत नवा पर्याय शोधण्याच्या मानसिकतेत येथील सामान्य मतदार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करीत 2015 झाली प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात केली होती आणि 2022 सर्वांसाठी घरे पूर्ण करण्याचे वचन दिले होते, मात्र 2022 साल उजाडण्याच्या उंबरठ्यावर असताना लोक घरकुलाची म्रुगजळाप्रमाणे प्रतीक्षाच करीत आहेत.
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कडून 110 लाभार्थ्यांना गेल्या एका वर्षापूर्वी एक लाख रुपयाचे शिल्लक अनुदान मिळावे यासाठी लाभार्थ्यांनी पाठपुरावा केला मात्र त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली.

आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत असलेला निधी राखीव ठेवला नाही.प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या लाभार्थी यादीत 110 लाभार्थ्यांचे उर्वरित शिल्लक अनुदानाचे हप्ते अद्यापही मिळाले नाहीत. प्रधानमंत्री आवास योजनेतील 400 लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर आहेत त्यांना अनुदान देण्याबाबत अद्यापही हालचाली झाल्या नाहीत. 850 प्रस्तावित लाभार्थ्यांचे डीपीआर मंजूर करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्याची मागणी धूळखात पडलेली आहे. नवीन घरकुल प्रस्ताव सादर करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची लॉग इन साईट सुरू करण्यात आलेली नाही . वाढत्या महागाईनुसार घरकुलासाठी पाच लाख रुपयांचे अनुदान देणे गरजेचे असताना आहे तीच योजना योग्य प्रकारे राबवली जात नाही. याबाबत मुख्याधिकारी मीनाक्षी यादव यांनी वेळ काढून धोरण अवलंबले मुळे जनतेमध्ये असंतोष पसरत आहे.


याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास त्याचा येत्या नगरपंचायत निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना चांगलाच फटका बसणार असल्याचे जनतेच्या प्रतिक्रिये वरून निदर्शनात येत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!