Post Views: 756
अमरावती भुमी अभीलेख कार्यालय स्वंशयाच्या भोवऱ्यात.शेतकऱ्याची महसुल मंत्र्याकडे तक्रार.
राजेंद्र वाटाणे /अमरावती.
मोजनी अर्जावर खोट्या सह्या करुन करोडो रुपये किंमत असलेल्या जागेतील ७ गुंठे क्षेत्रफळ कमी दाखवण्याचा प्रताप उपअधिक्षक भुमी अभिलेख अमरावती यांनी केला असुन झालेल्या अन्याया विरोधात ७४ वर्षीय शेतकर्याला भुमीअभीलेख कार्यालयाचे खेटे घालावे लागत असल्याचा प्रताप ऊघडकीस आला आहे.
सविस्तर वृत्त असे अमरावती शहराला लागुनच असलेल्या कठोरा बद्रुक येथील शेत सर्वै न.७५/३ हे शेत क्षेत्रफळ १ हेक्टर ३९ आर १९४० मध्ये दौलतराव काळबांडे यांनी तत्कालीन तहसिलदार व उपविभागीय अधिकारी महसुल यांनी विक्रीचा जाहिरनामा काढून विक्री चा दाखला वताबा पावती देऊन रितसर ताब्यात दिले होत .त्यानंतर हे शेत त्यांच्या मुलाचे नावे झाले आज या शेताच्या आजुबाजुला मोठमोठ्या काॕलनी निर्माण झाल्याने वासुदेवराव काळंबांडे यांनी सदर शेताचे मोजणी करीता भुमीअभिलेख कार्यालयात २० फेब्रुवारी २०२१ ला अर्ज सादर केला होता ज्यावर ११ मार्चला मोजणी झाली.
परंतू झालेल्या मोजणी दरम्यान अर्जदार हजर नसतांना त्याच्या खोट्या सह्या करुन सदर क्षेत्रफळ ७३ गुंठे असल्याचे दाखवण्यात आले. यावर वासुदेवराव काळबांडे यांनी ३१ मार्चला हरकत घेतली त्यांनतरही भुमीअभीलेख कार्यालयाकडून कोणताच प्रतीसाद मिळत नसल्याचे पाहून कार्यालयात माहीतीचा अधिकारामार्फत कागदपत्रे मागवण्यात आली परंतू तेथेही अपीलापर्यंत जावून कोणताच फायदा झाला नाही.२००६ मध्ये केलेल्या मोजणीत या शेताचे क्षेत्रफळ ८० आर दाखवण्यात आले आहे.भुमी अभीलेख कार्यालयातील ज्या कर्मचाऱ्याने ७ गुंठे क्षेत्र कमी दाखवले त्याच्यावर अर्जदाराने आक्षेप घेतला असतांना त्याच कर्मचाऱ्याला पुन्हा मोजणी करण्याकरीता पाठवले
यामुळे भुमीअभिलेख कार्यालयातील त्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून आपले खिसे गरम तर करत नाही ना ? ज्या शेतीची कींमत सध्या करोडोच्या घरात आहे त्यातील ७ गुठे क्षेत्र दुसऱ्याच्या घशात घालण्याचातर भुमी अभिलेख कार्यालयाचा डाव नाही ना? असा प्रश्न ऊपस्थित होत असुन या सर्व प्रकरणाची चौकशी करुन संबधित अधीकारी व कर्मचाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर, महसुल मंत्री, जिल्हाधीकारी अमरावती,संचालक भुमीअभीलेख अमरावती यांचेकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
माझे शेताचे क्षेत्र ८० आर असतांना शेताची मोजणी करणारा कर्मचारी जी.जी.कोळमकर यांनी मुद्दामहुन ७ गुंठे क्षेत्र कमी दाखवल्याने मी ९ महिण्यापासून भूमीअभीलेख कार्यालयाच्या चकरा मारत असल्याने मला न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी वासुदेवराव काळबांडे यांनी केली आहे.