केरळमध्ये पावसानं रौद्र रूप धारण भुस्खलनामुळं 26 नागरिकांचा मृत्यू तर अनेक नागरिक बेपत्ता

केरळ :- त्रिवेंद्रम | केरळमध्ये सध्या पावसानं रौद्र रूप धारण केलं आहे. केरळमधील एकूण सातपेक्षा अधिक जिल्ह्यात पावसानं अक्षरश: जनजीवन विस्कळीत केलं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना स्थलांतरित केलं जात आहे.अजूनही पावसाचा जोर कायम असल्यानं राज्य सरकार केंद्र सरकारच्या मदतीनं विस्थापितांची सोय करत आहे.

मुसळधार पाऊस आणि भुस्खलनामुळं राज्यात आतापर्यंत 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक बेपत्ता आहेत. भुस्खलनाच्या खाली शेकडो नागरिक दबल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कोट्टायममध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. या भागात आतापर्यंत 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

हवाई दलाच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येत आहे. एनडीआरएफच्या एकूण 11 टीम मदतकार्य करत आहेत. नागरिकांना शक्य तेवढ्या सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत आहे. कोट्टायम भागातील सर्व नद्यांना महापूर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन यांच्याशी संपर्क साधत केंद्र सरकारकडूम मदतीची ग्वाही दिली आहे.

दरम्यान, केरळमधील परिस्थिती अधिक बिघडण्यापुर्वी राज्य सरकार नागरिकांना काळजी घेण्यास सांगत आहे. आणखीन 48 तास पावसाचं प्रमाण असंच राहाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे केरळात महापूराचं संकट आणखीनच वाढताना दिसतंय.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!