मा. नितीनजी म्हणजे लोकहिताचा कळवळा,केंद्रीय निधीतून भरघोस सहकार्य


लोक हितं मम करणीयम.

अमरावती जिल्ह्यातील शिवणगाव गावातील जीवघेणा पूल पुनर्जीवित होणार.
जनतेची प्राण हानी , पिकांचे व शैक्षणिक नुकसान टळणार.

तिवसा मतदार संघातील शिवणगाव येथील सूर्य गंगा पुलावरून मोठ्याप्रमाणावर पुराचे पाणी पावसाळ्यात नेहमीच वाहून जाते यामुळे गावाच्या आजूबाजूच्या शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. प्रसंगी जीवित हानी व खाजगी व सार्वजनिक संपत्ती चे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो.

आज हा जुना पूल पुनरुज्जीवित करण्यासाठी निधीची मागणी माननीय नितीनजीं कडे मी केली. माननीय नितीन जीने क्षणाचाही विलंब न लावता या पुलाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक असलेला निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले व पुढील प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यास सांगितले.

माननीय नितीनजींचे या संवेदनशील मागणीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारे व सतत पाठपुरावा करणारे शिवणगावचे रहिवासी व भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस श्री मुकेश कठाळे, भाजपा तिवसा तालुक्याचे माजी सरचिटणीस राजेश तेलंगे व सामाजिक कार्यकर्ते श्री आशिष भाऊ चव्हाण उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!