वाशीम जिल्ह्याचे मागासलेपण ग्रामोद्योगातून दूर होईल – कोटस्थाने

कारंजात एकदिवशीय औद्योगिक जागृकता कार्यशाळा उत्साहात

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:-आकांक्षीत जिल्हा असलेल्या वाशीम जिल्ह्याचे मागासलेपण ग्रामोद्योगातून दूर होईल. करिता मोठ्या प्रमाणावर लघु व मध्यम उद्योग उभारण्याची आवश्यकता आहे. असे मत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थाचे जनरल कौन्सिलचे सदस्य तथा प्रसिद्ध जलतज्ञ माधव कोटस्थाने यांनी व्यक्त केले. दि.10 डिसेंबर रोजी कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था( एमगिरी ) खादी ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदशाखा कारंजा, माजी सैनिक बहुउद्देशीय संघ, स्वा. सै. श्री. क.रा इन्नानी महाविद्यालय, ग्रिन्झा प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त आयोजनातून एकदिवशीय औद्योगिक जागृकता कार्यशाळा उत्साहात पार पडली यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रेय निनावकर, प्राचार्य डा. हळबे, कृषी विज्ञान केंद्राचे फळ उत्पादन तज्ञ निवृत्ती पाटील, माजी सैनिक सुरेश गोडसे (सातारा) अहमदपूर जि. लातूर बाजार समिती सभापती शिवानंद हिंगणे, एमगिरी अधिकारी वर्ग उपस्थित होता.सर्वप्रथम भारत माता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख अतिथींच्या हस्ते झाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दुर्घटनेतील लष्कर अधिकारीना मौन श्रद्धांजली देण्यात आली. सत्कार समारंभ करण्यात आला.

उदघाटन सत्रात कार्यक्रमाचे समन्वयक कुळकर्णी प्रास्ताविक मध्ये कार्यक्रमाचा उद्देश कथन केला. व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांनी उद्योग साक्षरता बाबत माहिती दिली. फळ उत्पादन तज्ञ निवृत्ती पाटील यांनी फळ व कृषी उद्योगाची संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमध्यक्ष कोटस्थाने यांनी अध्यक्षीय भाषणात वाशीम जिल्ह्यातील उद्योगासाठी पाण्याच्या उपलब्धते बाबत चिंता व्यक्त केली. यासाठी पुढाकार घेण्याचे सुद्धा आवाहन केले.कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात बायोप्रोसेसिंग आणि वनौषधी विभागाचे प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉ. आदर्श कुमार अग्निहोत्री यांनी वनौषधी, खाद्यपदार्थ आणि कृषी आधारित उद्योगांवर तर डॉ.जयकिशोर छांगाणी यांनी गोठ्यावर आधारित पंचगव्य उद्योगांवर, हनुमंथा गौडा सिनूर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, यांनी “कापूस ते वस्त्रोद्योग”, वरिष्ठ अधिकारी सचिन राऊत, सौरऊर्जा आधारित उद्योग, प्रा. वैज्ञानिक अधिकारी श्री. विकास चौधरी, ग्रामीण रसायन उद्योग, श्री. तुकाराम शेगोकर मातीकाम, टेराकोटा, मेटल क्राफ्टवर मार्गदर्शन, बांबूवर आधारित उद्योग बाबत सविस्तर माहिती दिली. खादी ग्रामोद्योग विविध उद्योग – व्यवसायाची संपूर्ण माहिती शशिकांत सरकंडे यांनी दिली. माजी सैनिक सुरेश गोडसे (सातारा ) यांनी माजी सैनिकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. अखेरच्या सत्रात प्रश्नोत्तर होऊन सांगोपांग चर्चा झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजा गोरे तर आभार प्रदर्शन सेवानिवृत्त कॅप्टन अतुल एकघरे यांनी व्यक्त केले.


आझादी का अमृतोत्सव – ७५ ह्या उपक्रमातून
वाशीम जिल्ह्यात ग्रामद्योगातून रोजगार उपलब्धतेची साखळी निर्माण करण्याची मनीषा याप्रसंगी चर्चेतून करण्यात आली. “जय जवान- जय किसान – जय विज्ञान” या ब्रीद वाक्यावर आधारित वाशीम जिल्ह्याचे मागासलेलापणा दूर करण्यासाठी झटण्याचा सहभागीदारानी इच्छा व्यक्त केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!