कोयाळी(ता. खेड) येथील श्री भानोबा देवाची यात्रेला भक्तांची मोठी गर्दी

प्रतिनिधी :- कुणाल शिंदे सह लहू लांडे, पुणे

भानोबा हे नवनाथ पंथींचे जागरुक देवस्थान मानले जाते,तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले भाविक युद्धाचा थरार अनुभवतात .मार्गशिर्ष प्रतिपदेला भानोबा मंदिरासमोरील पटांगणात देव-दानवांच्या युद्धाचा थरार अनुभवलायला मिळतो.
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कोयाळी गावात सालाबादप्रमाणे दिनांक 5 डिसेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 रोजी नुकतीच भानोबाची यात्रा पार पडली. भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे.भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक, ओलांडा, ओव्या ,छबिना सोहळा, पोवाडा, विविध धार्मिक कार्यक्रम, आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला आहे
.

यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ पहा थोडक्यात

ढोल-ताशांचा गजर आणि ‘भानोबाच्या नावानं चांगभलं’, असा उद्घोष करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. देव-दानवांच्या युद्धाचे
देव-दानवांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी, तसेच श्री भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसांत हजारो भाविकांनी हजेरी लावली
.

तत्पूर्वी पहाटे श्री भानोबादेवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली.त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला.सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत देव-दानव युद्ध झाले, दोन दिवसांत एकूण १ हजार चारशे भाविकांनी या युद्धात सहभाग घेतला.भानोबा देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबारीतून सुरुवात झाली.

हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी-भानोबाच्या देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील विविध मंडळे, संस्था, तरुण वर्ग तसेच सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले, यात्रे दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, व आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हजारो वर्षांची परंपरा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हा दिन भानोबा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो, यात्रेमध्ये विशेष करून पशुहत्या बंदी, व संपूर्ण गाव नशामुक्त आहे, तसेच यात्रेत कोरोना नियमांचे पालन करण्यात आले,
या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.


भानोबादेव मंदिराबाहेर पडल्यानंतर मानवरुपी दानवाने आपल्या हातातील शस्त्रम्हणजे काठी ,देवासमोर फिरवून उड्या घेतल्या,मात्र देवाच्या नजरेला नजर पडल्यानंतर ते त्या क्षणी जमिनीवर पडले, दरम्यान त्यांना देवाचा स्पर्श देण्यात आला त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाचा जयघोष करून त्यांना शुद्धीवर आणले जाते,अतिशय मनमोहक, भक्तिमय वाटणारे हे दृश्य दरवर्षी कोयाळी गावात भाविकांना आकर्षित करते,गावोगावी होणाऱ्या यात्रा हा महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, लोकांच्या भावना, श्रद्धा त्याच्यासोबत जोडलेल्या आहेत,भानोबाची यात्रा हे त्याचेच एक उदाहरण आहे
.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!