चाकण मार्केटयार्डमध्ये कांद्याची आवक घटल्याने भाव वधारले,मेथीची आवक वाढुन भाव स्थिर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे:-

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये आज शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे भाव वधारले दिसुन आले.तसेच बटाट्याची आवक कमी होऊन दर कमी झालेला देखील पाहायला मिळाला. परंतु कोबीला व पालक भाजीला दरात मोठी घसरण झाल्याने त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सुर दिसून आला.मात्र कोबीची व मेथीच्या भाजीची आवक सर्वात जास्त आज भाजीपाला बाजारात झालेली पहायला मिळाली.त्यामुळे कोबीचे दर खाली घसरले होते.उत्पादन खर्च, गाडी भाडे ,औषधे मजुरी देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांना चिंता व्यक्त केली आहे.मात्र काही शेतकऱ्यांनी किरकोळ बाजारात कोबीची विक्री केल्याने चांगला दर मिळालेला पाहायला मिळाला.

खेड तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीकाचे उत्पादन घेतले जाते. चाकण मार्केटयार्डमध्ये देखील कांद्याचा मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने मोठी उलाढाल पाहायला मिळते.त्यामुळे चाकण कृषी उत्पन्न बाजारपेठ देखील देशात कांद्यासाठी प्रसिध्द आहे.तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम चालू असून सोयाबीन, बटाट्याची,भुईमूग शेंगाची काढणी चालू आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील काही शेतकऱ्यांनी कांदा पिकाची अजुन लागवड केली नसल्यामुळे कृषी उत्पन्न बाजारात कांदा येण्यासाठी अजुन बराच कालावधी लागणार आहे.तसेच ह्या वर्षी पावसाने दडी मारल्याने व हवामान बदलामुळे कांदा पिकाची लागवड उशीरा शेतकऱ्यांकडुन करण्यात येत आहे.त्यामुळे कांदा पिकाची आवक बाजारात कमी होऊन भाव वधारले होते.मागील शनिवारच्या तुलनेत कांद्याची आवक २०० क्विंटलने कमी झालेली पाहायला मिळाली,तसेच तळेगाव बटाट्याची आवक देखील १००० क्विंटलने कमी झाली.कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचा भाव कमाल ३५०० रुपयांवरून किमान २००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल पर्यंत पोहचला.व तळेगाव बटाट्याची भाव देखील प्रतिक्विंटलने कमी होऊन कमाल १४०० ते ८०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले.

तसेच चाकण भाजीपाला मार्केट यार्डमध्ये ,कोबी,फ्लॉवर,टोमॅटो मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळाली.आवक वाढल्याने देखील दर स्थिर झाल्याचे दिसून आले.लसणाची देखील १८ क्विंटल आवक होऊन भाव स्थिर राहिले.,वांगी,भेंडी, व काकडी यांची आवक वाढली असुन भाव स्थिर राहिले.आज झालेल्या आठवडे बाजाराची एकुण उलाढाल २७ लाख रुपये इतकी झाल्याचे पाहायला मिळाली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!