चाकण मार्केटयार्डमध्ये भाजीपाला कडाडला,कोथिंबीर जुडी 30 रुपये

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी शनिवारी झालेल्या आठवडे बाजारात भाज्यांची आवक कमी होऊन भाव कडाडल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे भाजीपाला बाजारात भाज्यांच्या दरात मोठी वाढ होऊन आज कोथिंबीर जुडीला शनिवारच्या तुलनेत उच्चांकी 30 रुपये भाव मिळाला.तसेच कांदा ,बटाट्याची, आवक वाढुन दरात ३००ते ५०० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सध्या तालुक्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने, ढगाळ हवामानामुळे भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे.याच कारणाने भाजीपाल्याचे भाव कडले असून सामान्य लोकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागनार आहेत।वाढल्याने कांद्याचे भाव घसरले दिसुन आले.कोथँबिरीच्या 38960 व मेथीच्या 21540 जुड्यांची मोठ्या प्रमाणात आवक भाजीपाला बाजारात झाल्याची पाहायला मिळाली.

o

आज भाजीपाला बाजारात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आवक झाल्याने ४ रुपये ७ मेथीला व १० रुपये ३० रुपये कोथंबीर जुडीला असा उच्चांकी भाव मागील शनिवारच्या तुलनेत पाहायला मिळाला .मात्र हिरवी मिरची व फ्लॉवरची आवक सर्वात जास्त झालेली आज भाजीपाला बाजारात झालेली दिसुन आली.

खेड तालुक्यातील ग्रामीण भागात खरीप हंगाम संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीकाचे उत्पादन घेतले जाते. चाकण मार्केटयार्डमध्ये देखील कांद्याचा मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने मोठी उलाढाल पाहायला मिळते.त्यामुळे चाकण कृषी उत्पन्न बाजारपेठ देखील देशात कांद्यासाठी प्रसिध्द आहे.तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम संपल्यानंतर कांदा पिकाची लागवड केली.परंतु बदलते हवामान,अवकाळी पाऊस यामुळे अजुन नवीन कांदा बाजारात कृषी उत्पन्न बाजारात कांदा येण्यासाठी अजुन बराच कालावधी लागणार आहे.त्यामुळे कांदा पिकाची आवक कमी जास्त प्रमाणात होत असलेली पाहायला मिळत आहे.

मागील शनिवारच्या तुलनेत कांद्याची आवक थोडी वाढल्याने कांद्याचा भाव कमाल २५०० रुपयांवरून किमान १२०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल पर्यंत पोहचला.व तळेगाव बटाट्याची भाव देखील प्रतिक्विंटलने स्थिर होऊन कमाल १८०० ते ११०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच चाकण भाजीपाला मार्केट यार्डमध्ये ,हिरवी मिरची,कोबी,फ्लॉवर,टोमॅटो मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळाली. बाकीच्या भाज्यांची आवक कमी झाल्याने भावात मोठी वाढ झालेली आहे.लसणाची देखील २१ क्विंटल आवक होऊन भाव स्थिर राहिले.,आज झालेल्या आठवडे बाजाराची एकुण उलाढाल ३० लाख रुपये इतकी झाल्याचे पाहायला मिळाली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!