राज्यघटनेप्रती बांधिलकी जोपासावी-न्या. शैलजा सावंत,संविधान व विधी दिन साजरा

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम- ज्येष्ठ विधिज्ञांनी भारतीय राज्यघटनेप्रती आणि कायद्याप्रती आपली बांधिलकी जोपासून वर्षातून काहीतरी प्रकरणांमध्ये कोणतेही शुल्क न करता गोरगरिबांची बाजू मांडावी. असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत यांनी व्यक्त केले.


आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन आणि विधी दिनाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आले होते, यावेळी न्या. श्रीमती सावंत अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न्यायिक अधिकारी सर्वश्री एस.एम.मेनजोगे, एस पी.शिंदे,आर. पी. कुलकर्णी, विधीज्ञ संघाचे सचिव ऍड एन टी जुमडे यांची उपस्थिती होती.


यावेळी न्या.श्री शिंदे यांनी नागरिकांचे मूलभूत कर्तव्य,न्या. कुलकर्णी यांनी मध्यस्थीचे फायदे,ऍड. दिपाली सांभर यांनी मूलभूत अधिकार या विषयावर आपले विचार मांडले.

कार्यक्रमाला वाशिम जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी पी. एच. नेरकर, एस. के. खान, पी.पी देशपांडे, जी.बी जानकर,आर.पी. शिंदे, श्री. पदवाड व श्रीमती पाचडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विधीज्ञ, न्यायालयातील कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते. यावेळी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड संजय शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन व आभार न्या.श्रीमती एस. पी. फुलबांधे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!