दर्यापूरात संविधान सन्मान परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा

सविधांनामुळेच शेतकऱ्यांच्या समोर झुकले मोदी सरकार : -प्रा.जावेद पाशा कुरेशी

दर्यापूर – महेश बुंदे

भारतीय नागरिकांना जगण्याचे स्वतंत्र देणारे भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ असून राज्यकर्त्यांना सुद्धा सामान्य नागरिकांच्या समोर झुकावे लागते, एवढी ताकद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात आहे,म्हणूनच शेतकरी आंदोलनाच्या समोर झुकत केंद्रातील मोदी सरकारने शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरकारला सुद्धा झुकविण्याची ताकद संविधानाने नागरिकांना दिली,भारतीय संविधान नसते तर वर्षभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन स्थळीच सरकारने चिरडले असते,असे प्रतिपादन भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक प्रा.जावेद पाशा कुरेशी यांनी केले.
ते दर्यापूर येथील संविधान चौकात दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान सन्मान परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात “भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले संविधानिक अधिकार” या विषयावर बोलत होते.

अलीकडे भारतीय चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत हिने भारतीय स्वातंत्र्य लढा यावर केलेल्या बेजबाबदार वक्तव्यावर कोणताही राजकीय नेता आक्षेप घेत नाही ही देशाची शोकांतिका आहे.भारतीय नागरिकांना देशांची व्यवस्था बदलाची ताकद संविधानाने ‘मतदानाचा हक्क’देऊन दिली आहे,पण नागरिक त्याचा कोणत्याही फायदा घेत नाहीत,असेही ते म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार हीच आपल्या देशाच्या लोकशाहीची खरी ताकद आहे,देशातील आजची भयवाय परिस्थिती बदलाची असेल तर सुजाण नागरिक म्हणून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संविधान सन्मान परिषदेचे सदस्य रामदास गवई, अनिरुद्ध वानखेडे, गजानन चौरपगार, दीपक बगाडे,गौरव भराटे,दादाराव इंगळे,अनिकेत गावंडे,किरण इंगळे,धनंजय देशमुख, मंगेश सावळे, सुधीर गावंडे,धम्मशील मेश्राम आदी उपस्थित होते.

दर्यापूर येथे गेल्या सात वर्षांपासून शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचाराच्या युवकांनी एकत्र येऊन संविधान सन्मान परिषदेच्या वतीने नागरिकांमध्ये संविधानिक हक्क, कर्तव्य, मूल्य यांची समज वाढावी.सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य या भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेल्या आदर्शांचा प्रसार व्हावा तसेच न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता हे उद्देश साध्य करण्यासाठी जनजागृती व्हावी हा शुद्ध हेतू बाळगून अनेक कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते,अशाच प्रकारे यावर्षी सुद्धा संविधान दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरवात कु. आईशा आशिष वानखडे हिने संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करून केले. याप्रसंगी किरण इंगळे,गौरव भराटे यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचलन प्रा.ज्ञानेश्वर मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक धनंजय देशमुख व आभार प्रदर्शन अनिकेत गावंडे यांनी केले.

संविधान दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संविधान सन्मान परिषेदेचे अनिरुद्ध वानखडे, पंकज गावंडे, आशिष वानखडे, विजय इंगळे, निलेश वानखडे,आकाश चौरपगार, सुमित गवई, नागोराव मोहोड, सचिन वानखडे,आकाश गवई, अनिकेत तायडे, चेतन कांबळे, मिलींद वानखडे, दर्शन गवई, रणजित इंगळे,ऋषभ वाघमारे, प्रशांत वानखडे, शुभम बोरखडे, प्रेमदीप आठवले, रोहित खंडारे, रोशन गवई, यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!