मुंबई येथे 26/11 झालेल्या हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण….

प्रतिनिधी विवेक माेरे

नांदगाव खंडेश्वर:- तालुक्यातील शिरपूर येथे मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समुद्र मार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या 10 जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी ताज हॉटेलमध्ये नागरिकांना लक्ष करत त्यांच्यावर गोळीबार केला. त्याचसोबत बॉम्ब स्फोट सुद्धा घडवून आणला. इतिहासातील सर्वाधिक भीषण आणि भयावह अशा या दहशतवादी हल्ल्यामुळे आज ही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. या हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमावावा लागला तर 300 हून अधिक जण जखमी झाले होते.

याच पार्श्वभूमीवर ओम मोरे, तेजस पुसदकर, गणेश पुसदकर यांनी शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून विरांगणाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रामचंद्रजी सरदार, गुलाबराव पुसदकर, श्रवण पुसदकर, नंदन पुसदकर, विधी पुसदकर, श्रेयश रोकडे, तेजस पुसदकर, गणेश पुसदकर व ओम मोरे आदी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!