एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

दर्यापूर – महेश बुंदे

कोरोनामुळे दीड वर्ष शाळा बंद होत्या. दिवाळीनंतर आता शाळा, महाविद्यालय सुरू झाले आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून येणे अशक्य झाले आहे. शाळेत येता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेचे तेराशे विद्यार्थी लाभार्थी आहेत. मात्र बस बंद असल्याने मुलींचा हिरमोड झाला आहे.

पालकांना देखील मुलींना शाळेत कसे पाठवावे असा प्रश्न सतावत आहे. प्रदीर्घ काळ ऑनलाइन शिक्षणात डोके खूपसल्याने विद्यार्थ्यांचा ऑफलाइन शिक्षणाची उत्सुकता लाभली होती. मोजकेच दिवस शाळा, महाविद्यालयात जाण्याचा योग आला. पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने सुमारे चार हजार विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!