२७गावांचा पाणीप्रश्न सुटणार… जलकुंभांच्या जागेचा प्रश्न निकाली… योजनेला गती मिळणार…

ठाणे प्रतिनिधी नीरज शेळके :-

जलकुंभांच्या जागेपोटी द्यावा लागणारा रु. ८०कोटीचा मोबदला माफ करण्याच्या मागणीवर ठाणे जिल्हाधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद…

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ झाली असून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी अमृत योजनेची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी १९० कोटींची पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पाणी उचल केंद्र, पाणी पुरवठा केंद्र, जल शुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्या टाकण्याचे काम केले जाणार आहे. पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलकुंभ (ElevatedStorageReservoir) उभारण्यात येणार असून यातील ९ ठिकाणच्या जागा शासनाच्या मालकीच्या असून त्यांचा रु.८० कोटींचा मोबदला देणे खर्चिक ठरणार आहे.

यावर तोडगा काढण्यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासमवेत कल्याण -डोंबिवलीचे खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे १९० कोटींच्या पाणी पुरवठा योजनेतील ८० कोटी रूपये जलकुंभांच्या जागेसाठी गेले तर त्याचा योजनेवर परिणाम होण्याची भीती आहे तसेच पाणी पुरवठा योजना हे काम शासकीय काम असून त्यातून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने या जलकुंभांच्या जागेपोटी द्यावे लागणारे ८० कोटी रूपये माफ करावे अशी आग्रही मागणी या बैठकीमध्ये त्यांनी केली. या मागणीवर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!