हिट अँड रन कायदा लागू लगेच लागु नाही,माल वाहतुकदारांचा संप अखेर मागे

दिल्ली :- गेल्या 2 दिवसांपासून पुकारलेल्या मालवाहतूकदारांचा संप अखेर मिटला आहे. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही असं आश्वासन केंद्र सरकारचं माल वाहतूकदारांना दिले आहे.त्यामुळे सरकार संपावर तोडगा काढण्यात यशस्वी झाले आहे. या संपाचे पडसाद संपूर्ण देशभरात पहायला मिळाले.

माल वाहतूक दारांच्या संपामुळे अनेक ठिकाणी देशभरात महामार्गावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच भाजीपाला,दर मोठ्या प्रमाणात वधारले व पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होती. डिझेल न मिळाल्याने रुग्णवाहिका, व स्कूल बसच्या संघटना देखील यामध्ये सहभागी होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता.

केंद्रीय गृह सचिव आणि ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची बैठक पार पडली. हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही अंस आश्वासन केंद्र सरकारने माल वाहतूकदारांना दिले आहे. केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्याचं वाहतूकदार संघटनेने आवाहन केले. नवा कायदा लागू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका वाहतूकदारांनी मांडली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!