रासे गावात कृषी विभागाकडून पीक विमा योजनेची जनजागृती, गावामध्येच पीक विमा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी..

प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- राज्यात शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकरी बांधवांसाठी चालूं करण्यात आली आहे. अवघ्या 1 रुपयांत आपल्या शेतातील पिकाचा विमा शासनाकडून उतरवला जात असुन त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे.

रासे गावात देखील शासनाच्या कृषी विभागाकडून पंतप्रधान पीक विमा योजनेच्या संदर्भात माहिती ही शेतकऱ्यांना देण्यात आली.यावेळी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक योजनेचे फायदे सांगितले गेले. तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर आलेल्या कृषी अधिकारी यांनी उत्तरे देण्यात आली.या बैठकीला गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परंतु शासनाने सुरू केलेल्या या 1 रुपयांत पीक विमा योजनेच्या नावाखाली नागरी सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांकडुन जादा शुल्क आकारले जात असल्याचे बाब समोर येऊ लागली आहे.तसेच ऑनलाइन फॉर्म मोबाईलवर व इतर ठिकाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना वेबसाईटवर ताण येऊन ती बंद पडत आहे. तसेच मध्येच सर्वर बंद पडत असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा फॉर्म भरायचा कसा?? असा प्रश्न उभा राहिला आहे.

त्यांमुळे शासनाला शेतकऱ्यांसाठी 1 रुपयांचा पीक विमा काढायचा असेल तर शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला न लावता एकाच ठिकाणी गावांमध्ये कृषी विभागाने सोय करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता तरी कृषी विभाकडून कसे नियोजन केले जाणार हेच पाहावे लागेल…

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!