प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- उद्यापासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.शाळेची पहिली घंटा उद्यापासुन वाजणार असुन शाळेचा पहिला दिवशी मुलांचे स्वागत करायला शाळा सज्ज झाल्या आहेत.त्यामुळे विध्यार्थ्यांना लागणारी वह्या पुस्तके,पेन,पेन्सिल खरेदी करण्यासाठी आज चाकण येथील बाजारात पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

अनेक पालक आपल्या मुलांना शालेय साहित्य घेण्यासाठी बाजारात घेऊन आले होते.परीक्षा संपल्यावर 2 महिन्यापासून शाळांना दिलेली सुट्टी उद्या संपत आहे.उद्यापासून राज्यातील सर्व शाळा ह्या सुरू होणार असुन शाळेची सर्व तयारी शिक्षण विभागाने केली आहे.या वर्षांपासून सरकारी शाळांमध्ये विध्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच वहीची पाने उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझं कमी होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले.

परंतु राज्यात अनेक सरकारी शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, खोल्याची पडझड, मुलांना क्रीडांगण,व शिक्षकांची कमी असल्याने त्रास होत आहे. त्यामुळे आता तरी राज्य शासनाकडून अशा शाळांची चौकशी होऊन मुलांना सुविधा मिळणार का हेच पाहावे लागेल.