प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बैलगाडा मालक नाराज झाले होते. यावर अनेक लोकप्रतिनिधीनी आपल्या परिसरात आवाज उठवला होता. बैलगाडा संघटना देखील आक्रमक होऊन अनेक वेळा आंदोलने करण्यात आली होती. परंतु आज सुप्रीम कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याला विजय प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील संस्कृती असलेल्या बैलगाडा शर्यत सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. त्यामुळे राज्यातील अनेक बैलगाडा मालक, व शेतकरी नाराज झाले होते. अनेक बैलगाडा संघटनेने यासाठी आंदोलने केली होती.अखेर आज सुप्रीम कोर्टाने याचा निकाल देऊन बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्याने ग्रामीण भागातील शेतकरी व बैलगाडा मालकांनी जल्लोष केला आहे. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया अनेक लोकप्रतिनिधीनी यावेळी बोलताना दिली. त्यामुळे आता गावोगावी होणाऱ्या यात्रांना आता मोठी गर्दी होऊन पुन्हा बैलगाडा घाटात सर्जा राजाची भिरर्रर्रर्र सुरू होणार आहे.